स्पर्धा परीक्षा पास होणे हे एक तंत्र - डॉ. वाय. एस. पी. थोरात


लोणी (प्रतिनिधी) : स्पर्धा परीक्षांसाठी घोकंपट्टी करण्यापेक्षा उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे अभ्यासाचे तंत्र विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्यास त्यांना यश नक्कीच मिळेल. स्पर्धा परीक्षेसाठी वेळेचे नियोजन, ग्रुप स्टडी, अवांतर वाचन व व्यक्तिमत्व विकास ह्या बाबींचा विद्यार्थ्यांनी अंतर्भाव करायला हवा असा मूलमंत्र नाबार्डचे माजी चेअरमन व संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात यांनी दिला.
                    लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्रवरा ऍकॅडमी ऑफ कॉम्पिटेटिव्ह सक्सेस (पॅक्स) च्या एमपीएससी व यूपीएससीच्या कृषी व कृषी संलग्नित व पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रशासकीय सेवेतील निवडीचे व  कामकाजाचे अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडताना परीक्षा पास झाल्यानंतरच्या मुलाखतीसाठी सामोरे जाताना समयसूचकता व हजरजबाबीपणा महत्वाचा असतो. मुलाखत घेणाऱ्या पेक्षा मुलाखत देणाऱ्याच्या हाती जर मुलाखत नियंत्रणाचे तंत्र असेल तोच यशस्वी होऊ शकतो असे त्यांनी सांगितले. त्यावेळी सहसचिव भारत घोगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, तांत्रिक शिक्षण संचालक डॉ. के. टी. व्ही रेड्डी, अतांत्रिक शिक्षण संचालक डॉ. दिगंबर खर्डे, पॅक्स समन्वयक डॉ. शैलेश कवडे, कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, प्राचार्य ऋषिकेश औताडे व प्राचार्य निलेश दळे उपस्थित होते, प्रास्ताविक कु. मोनिका आंधळे तर आभार श्री. रविंद काकडे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस